21 C
New York

Manoj Jarange : “पर्याय नाही” म्हणत जरांगेंनी दिले राजकारणात एन्ट्रीचे संकेत

Published:

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात जनजागृती करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत राजकारणात येणार नाही अशी भूमिका त्यांनी आधीच व्यक्त केली होती. मात्र राज्यातील बदललेली परिस्थिती पाहता या भूमिकेत बदल करण्याचे संकेत आज जरांगे पाटील यांनी दिले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि विधानसभा निवडणुक (Elections 2024) लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, आज मूळ गावी मातुरी येथे यात्रेसाठी निघालो आहे. आमचं मूळ गाव आहे. दर्शनासाठी जाणार आहे. सरकारशी कोणतंही बोलणं झालेलं नाही. पाऊस सुरू आहे सरकार त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देणार नाही. पण, येत्या 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज (Maratha Reservation) एकत्र येणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढायची की नाही याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणाच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले.

मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढणार की नाही?

Manoj Jarange तर मराठा तुमचं राजकीय करीअर संपवून टाकेल

मनोज जरांगे पाटील मागील दिवसांपासून सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तर त्यांनी (Devendra Fadnavis) घणाघाती टीका केली आहे. आताही त्यांनी पुन्हा भाजपला फैलावर घेतलं. भाजपाच्या (BJP) लोकांचे डोके काम करत नाही. मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाहीत. आम्ही सुद्धा त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करीअर मराठा संपवून टाकेल असा इशारा त्यांनी दिला.

Manoj Jarange फडणवीसांनंतर जरांगेंचाही सवाल

दरम्यान, याआधी पुण्यातील बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधी पक्षांना हाच प्रश्न विचारला होता. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे की नको असा सवाल फडणवीसांनी यांनी व्यासपीठावरून विचारला होता. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील हाच सवाल विचारून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या प्रश्नावर महाविकास आघाडीचे नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img