21 C
New York

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौतचं लोकसभेत पहिलं भाषण

Published:

Kangana Ranaut First Loksabha Speech: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut) ही नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशमधल्या मंडी (Mandi) लोकसभा मतदारसंघातून निवडून आली. संसद प्रवेशाचीही कंगना रणौतची जोरदार चर्चा झाली होती. कंगनाने यंदाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदारकीची घेतलेली शपथदेखील खूप चर्चेत राहिली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन सुरू होऊन जवळपास महिना गेल्यानंतर कंगना रणौतला अखेर (२५ जुलै) गुरुवारी तिला पहिल्यांदा बोलण्याची संधी देण्यात आली.

आता, पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. यादरम्यान, कंगना रणौतला लोकसभेत आपलं पहिलं-वहिलं भाषण करण्याची संधी मिळाली. कंगना रणौतनं अगदी काही मिनिटांच्या या भाषणात तिच्या मंडी मंतदारसंघातले दोन मुद्दे सभागृहासमोर मांडले. तसंच, या केंद्र सरकारकडून या मुद्द्यांबाबत नेमकी काय पावलं उचलली जात आहेत? असा प्रश्न कंगना रणौतनं उपस्थित केला.

काय म्हणाली कंगना रणौत?
Kangana Ranaut First Loksabha Speech: भाषणाच्या सुरुवातीला कंगनानं तिच्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांचे मनापासून आभार मानले. “अध्यक्ष महोदय, मी तुमचे मंडीच्या जनतेच्या वतीने आभार मानते की तुम्ही आज मला पहिल्यांदा मंडी लोकसभा मतदारसंघाबाबत या सभागृहात बोलण्याची संधी दिली”, असं कंगना रणौत म्हणाली. विशेष बाब म्हणजे कंगना बोलत असताना सभागृहामध्ये कोणीच व्यत्यय आणला नाही किंवा गोंधळ घातला नाही.

पुढे कंगनानं हिमाचल प्रदेशमध्ये घर बनवण्याची कला किंवा लोकरीपासून कपडे विणण्याची कला ही लुप्त होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. “मंडीमध्ये अशा बऱ्याच कला आहेत ज्या विलुप्त होत चालल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये एक काथ-कुनी नावाची घर बनवण्याची पद्धत व कला आहे. तिथे मेंढ्या व याकच्या लोकरीपासून टोप्या, शॉल, जॅकेट, स्वेटर अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात. परदेशात या वस्तूंना खूप मोठी किंमत मिळते. मात्र, आपल्या देशात या कला पूर्णपणे लुप्त होत चालल्या आहेत. या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणती पावलं उचलली जात आहेत?”, असा प्रश्न कंगनानं उपस्थित केला.

याच प्रश्नाला जोडून कंगनाने हिमाचल प्रदेशमध्ये दिसून येणाऱ्या स्थानिक लोकसंगीताच्या संवर्धनाचा मुद्दाही उपस्थित केला. “हिमाचल प्रदेशचं एक वेगळं असं संगीत आहे. किनौर, स्पिती, किंवा भरमौरच्या क्षेत्रात हे स्थानिक लोकसंगीत आढळून येत. तिथल्या आदिवासी जमातींमधील कपड्यांच्या प्रकारांप्रमाणेच हे संगीतही खूप विशेष आहे. याचं संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारकडून काय केलं जात आहे?” कंगना रणौतने असा प्रश्नसुद्धा संसदेतील तिच्या पहिल्या-वहिल्या भाषणात सरकारला विचारला.

‘राज ठाकरेंची नुकतीच भारतात एन्ट्री; नक्की राऊत म्हणाले तरी काय

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कंगना रणौत ही मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आली. मात्र, कंगना रणौतच्या या निवडणुकीला विरोधी पक्षातील उमेद्वारांन आक्षेप घेतला आहे. लायक राम नेगी मंडीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.निवडणुकांपूर्वी उमेदवार अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतरही आपला अर्ज बाद ठरवण्यात आला, असा दावा लायक राम नेगी यांनी केला आहे. त्यामुळे कंगना रणौत हिची खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी, अशी मागणी नेगी यांनी याचिकेत केली आहे.

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी या याचिकेसंदर्भात कंगना रणौतला नोटीस बजावत येत्या २१ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img