21 C
New York

Shivaji Maharaj Memorial : शिवस्मारकासाठी आझाद मैदानात जागरण गोंधळ

Published:

रमेश औताडे, मुंबई

अरबी समुद्रात होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Memorial) यांचे स्मारक गेल्या 10 वर्षांपासून सरकारने दुर्लक्षित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी बुधवारी आझाद मैदानात (Azad Maidan Protest) जागरण गोंधळ घालण्यात आला. यापुढेही सरकारने जर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर स्वाक्षरी मोहीम राबवत जनजागृती करणार व त्यानंतर तीव्र बेमुदत आंदोलन करणार असा इशारा जय शिव संग्राम चे मुंबई अध्यक्ष शशिकांत शिरसेकर यांनी आझाद मैदानात दिला.

२०१३ मध्ये अरबी समुद्रात श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक बांधण्याचा प्रस्ताव आणला होता. त्या नंतर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात स्मारकाचे जलपूजन केले होते. आज १० वर्ष होऊन गेली. आतापर्यंत कामाला सुरुवात झाली नाही.
देशांमध्ये इतर करोडो रुपयांचे प्रकल्प तयार झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय कोणीही घेत नाही असे सरचिटणीस मुख्य प्रवक्ते दिपक कदम यांनी सांगितले.

९० हजार कोटींचे रस्ते होत आहेत. अटल सेतू झाला. मुंबईच्या जमिनीखालून रेल्वे धावण्याच्या मुहूर्तावर आहे. लाडकी बहिण लाडका भाऊ आदी योजनांच्या घोषणा होत आहेत. मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाबाबत विरोधक व सत्ताधारी शांत बसले आहेत. त्यामुळे आता स्वर्गीय विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची जय शिव संग्राम आझाद मैदानात जागरण गोंधळ घालत आहे असे शिरसेकर यांनी सांगितले. यावेळी अनिल परब, आकाश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img