21 C
New York

Heavy Rain : मुसळधार पावसाचा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवेवर परिणाम

Published:

मुंबई: जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सगळी कसर भरुन काढली आहे. पाणीकपातीचा सामना करत असलेल्या मुंबईतही गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. गेल्या आठवड्यातील विकेंडमध्ये मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला होता. सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पुन्हा एकदा सोमवारी पहाटेपासून मुसळधार पावसाच्या (Mumbai Rain) सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.

सोमवारी मुंबईसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली असून थोड्याथोड्या अंतराने मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट सकाळच्या वेळी कार्यालयात आणि दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडलेल्या उडताना दिसत आहे.

Heavy Rain तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवेवर परिणाम

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. 15 ते 20 मिनिटांच्या विलंबाने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन धावत आहेत. तर 5 ते 10 मिनिटे पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन आणि तब्बल 15 मिनिटं उशीराने हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेन धावत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेवर अवलंबून असलेल्या चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. अद्याप मुंबईत सखल भागात कुठेही पावसाचं पाणी साचले नाही . पाऊस असल्याने रस्ते वाहतूक नेहमीप्रमाणे संथगतीने आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे यंत्रणांना सतर्क रहाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Heavy Rain कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याणच्या गुडघाभर पाणी साचले आहे .पाणी गुरुदेव हॉटेल ते शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रस्ताही तसेच जलमय झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img