26.6 C
New York

Arjun Kapoor: अर्जुन कपूरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत;

Published:

Arjun Kapoor: बॉलीवूडचे बरेच सेलिब्रिटी त्यांच्या कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेचा विषय बनतात. कधी त्यांच्या मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे, तर कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, तर कधी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. अशातच अभिनेता अर्जुन कपूर (arjun Kapoor) त्याने केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Arjun Kapoor: अर्जुन कपूरने पोस्टमध्ये काय लिहिले? “सकारात्मक असणं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुम्हाला जशा हव्या आहेत तशा घडतील असं नाही; तर या गोष्टी कशाही घडूदेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित राहणार आहात, तुम्ही ठीक राहणार आहात हेच माहित असणं म्हणजे सकारात्मक होत.” आता अर्जुन कपूरने केलेल्या या पोस्टच्या ओळींचा संबंध त्याच्या आणि मलायका अरोराच्या नात्याबद्धल आहे, असा अंदाज नेटकऱ्यांकडून लावला जातोय. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अर्जुन आणि मलायका यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच अर्जुनने केलेली ही पोस्ट हे कपल विभक्त झाल्याकडे इशारा तर देत नाही ना? असं सोशल मीडियावर म्हंटल जाऊ लागलं आहे.

Arjun Kapoor: अभिनेता अर्जुन कपूर (arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malayka Arora) हे बॉलीवूडचं लोकप्रिय कपल आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. मलायका आणि अर्जुनच्या वयात १२ वर्षांचे अंतर असल्यामुळे दोघांना अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागल्याचं पाहायला मिळालं आहे. २०१८ मध्ये अर्जुन आणि मलायकाने जेव्हा एका फॅशन शो कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये मलायकाच्या ४५ व्या वाढदिवशी, त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टता दिली होती.

‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार मोठा ट्विस्ट!

१९९८ साली मलायका अरोराने अरबाज खान बरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, ९ वर्षांनंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर अर्जुन आणि मलायका यांनी डेट करायला सुरुवात केली. आता अर्जुन कपूरच्या या पोस्टमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पुन्हा उधाण आल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, दिग्दर्शित रोहित शेट्टी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. दीपिका पदुकोण, करीना कपूर, अजय देवगण, रणवीर सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच अभिनेता अर्जुन कपूर ‘नो एन्ट्री-२’ या चित्रपटातदेखील झळकणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img