23.1 C
New York

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा प्रसाद लाडवर हल्लाबोल, म्हणाले

Published:

जालना

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्यात सध्या चांगलच वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर सडकून टीका करीत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी जरांगे यांना चॅलेंज करताच मनोज जरांगे यांनी आज त्यांच्यावर हल्लाबोल केला.

मनोज जरांगे म्हणाले की, प्रसाद लाड देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलत आहेत, लाड हा भंगार नेता असून बांडगूळ आहे, लाड यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एवढचं प्रेम असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न करावं, लाडला सांगा माझ्या नादी लागू नकोस, असा इशारा मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना दिलायं.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्य मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातून सुरु झाला आहे. मराठा समाजातील सर्वांनी या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं असून समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्यास मी खचून जात आहे, त्यामुळे कोणीही आत्महत्या करु नये, असंही आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आता सध्या मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरु असून आता अॅम्बुलन्सद्वारे प्रवास करुन उपोषण करणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिलायं. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघात उमेदवार उभे करायचे की पाडायचे हे ठरवणार आहोत, असाही इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img