26.6 C
New York

MLC Election : विधानसभेपूर्वी मविआ, महायुतीची उद्या अग्नीपरीक्षा, कोणाचे ‘बारा’ वाजणार?

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र (MLC Election) त्याआधीच महाराष्ट्रातलं राजकारण विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) निमित्ताने ढवळून निघालंं आहे. विधानपरिषदेत 11 जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. मविआने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत आहे. मतांची फूट टाळण्यासाठी राजकीय पक्षांचं हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मात्र, यातील दोन पक्षांनी असं काहीच केलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले आहे. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती आहे. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले आहे. आता हे आमदार मतदानाच्या वेळीच सभागृहात येतील.

महायुतीला 11 पैकी 10 जागा जिंकणे सोपे आहे, परंतु क्रॉस व्होटिंग झाले तर तीन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. शरद पवार यांच्याकडे 12 आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 तर काँग्रेसकडे 38 आमदार आहेत. या 12 उमेदवारांपैकी भाजपचे पाच उमेदवार सुरक्षित वाटतात, ते म्हणजे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर. महाविकास आघाडीमधून काँग्रेसचा 1 उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव सहज विजयी होऊ शकतात. जयंत पाटील यांना जिंकायचे असेल तर त्यांच्यासाठी मतांचे व्यवस्थापन करावे लागेल.

संख्याबळाचा विचार केला तर भाजप 103, शिंदे गट 39, अजित पवार गट 40 असे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या पाच उमेदवारांना विजयासाठी 115 आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. म्हणजेच 12 मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे 9 आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे आणखी तीन मते मिळवणे महायुतीसाठी अशक्य नाही. शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. या उमेदवारांनाही विजयासाठी सात अतिरिक्त मते मिळवावी लागणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांंनाही अतिरिक्त मते मिळवण्यासाठी जास्त तजवीज करावी लागणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

तरी देखील फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आमदारांना हॉटेलात ठेवले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img