26.6 C
New York

Agriculture State Award : संपूर्ण देशात कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल

Published:

भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल, न्यायमूर्ती पी सथाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १९ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार (Agriculture State Award) समितीने महाराष्ट्र राज्याला – २०२४ चा सर्वोत्कृष्ट ‘कृषी राज्य पुरस्कार’ देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १० जुलै रोजी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारण्यात येणार आहे. शेतकरी आणि शेतीवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या आणि ग्रामीण समृद्धी आणणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि राज्य यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

10 जुलैच्या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राझील, अल्जीरिया, नीदरलॅंड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना महाराष्ट्रात नेहमीच आणल्या जातात. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी या योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 21 लाख हेक्टरवर बांबू लावण्याचा सर्वात मोठा मिशन यावेळी हाती घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 17 लाख हेक्टरवर कृषी सिंचन पाणी पोहोचवण्यासाठी तब्बल 123 योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम देखील दुप्पट करणार महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नॅनो तंत्रज्ञानाद्वारे खतांच्या वितरण करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 4.63 लाखांची मदत केलेली आहे. Gadkari यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राजील, अल्जीरिया, नीदरलॅड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालॅड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

Agriculture State Award म्हणून महाराष्ट्राला पुरस्कार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वात 21 लाख हेक्टर वर बांबू लावण्याचे सर्वात मोठे मिशन हाती घेण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 17 लाख हेक्टरवर कृषी सिंचन पाणी पोहोचण्यासाठी 123 योजना राबवण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम दुप्पट करणार महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्याचबरोबर नॅनो तंत्रज्ञानद्वारे खतांचे वितरण करण्यासाठी 4.63 लाख शेतकऱ्यांना सरकारने मदत केली आहे. 2023 ला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार बिहारला तर 2022 तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशला देण्यात आला होता. 2008 ला या पुरस्काराची सुरुवात डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत करण्यात आली होती. 2008 चा पुरस्कार आंध्रप्रदेशला देण्यात आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img