23.1 C
New York

Jayant Patil : जयंत पाटील यांनी उघड केला डांबर घोटाळा

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर घोटाळा उघडकीस आणला. सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते. आपल्या सरकारमधील एका मंत्र्यांचे सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहे. या मंत्र्यांचा वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामे घेऊन प्रचंड मोठा घोटाळा केला आहे.

या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथील रेवस रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले. या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेंतर्गत एॅपरोच रोड ते जॅकवेलपर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नुतनीकरण करण्याच्या कामासाठी वापरलेल्या डांबाराच्या बिलाचा नंबर एकच आहे. (बिलाचा नंबर – BPCL 4582111044)
म्हणजेच या दोन्ही कामांसाठी एकच डांबर बील वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे.

नेवरे भांडारपूळे रोड या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ता रुंदीकरण आणि ब्लॅक टॉपींग कामासाठी वापरलेल्या डांबराचे पावती क्रमांक BPCL 4582165210 हा आणि MIDC अंतर्गत रत्नागिरी पाणी पुरवठा योजना अंतर्गत हार्चेरी जॅकवेल पर्यंत जाणारा ॲप्रोच रस्ता पुर्नडांबरीकरणाचे केलेले कामाचे डांबराच्या बिलाचा नंबर देखील सारखाच आहे. म्हणजेच  या दोन्ही कामासाठी देखील एकच डांबर बील वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे.

ही उदाहरणे देत असताना जयंत पाटील यांनी या कंपनीने अशा प्रकारचे शेकडो कोटीचे अनेक भ्रष्टाचार केले आहे असा आरोप देखील केला. तसेच या प्रकरणात अनेक अधिकारीही सामील असून तेही या भ्रष्टाचारास तितकेच जबाबदार आहेत असे ते म्हणाले.

सरकारमधील लोकांनी रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करुन सरकारचे तोंड काळे केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या कंपनीने केलेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी. तसेच, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कंपनीवर व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी करण्याचे निर्देश द्यावे. अशी मागणी त्यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img