23.1 C
New York

Vijay Wadettiwar : धारावी प्रकल्पावरून वडेट्टीवारांचे सरकारवर गंभीर आरोप

Published:

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विविध विषयांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. त्यामध्ये आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धारावी विकास प्रकल्पावरून (Dharavi Project) सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई अदानींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. तसेच त्याला विरोध करणाऱ्या मुंडेंचीही बदली करण्यात आल्याचे गंभीर आरोप धारावी प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी केली.

विधानसभेमध्ये धारावी प्रकल्पावरून वडेट्टीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ते म्हणाले की, मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. बिल्डरांच्या घशात घातली जात आहे. यातून मुंबईला कोण वाचवणार? यामध्ये धारावी प्रकल्पामध्ये अगोदर साडेपाचशे एकर जागा दिली. त्यानंतर 1203 एकर जागा दिली. मात्र भाजपचा नीट बोलता येत नाही. जरा तोत्रच बोलणारा नेता म्हटला की, एक इंच ही जागा दिली नाही. मात्र मिठागराची जागा देखील बिल्डरला देण्यात आली. त्यानंतर दुग्ध शाळेची जमीन देखील देण्यात आली. ही सर्व जागा आदानींना हस्तांतरित करण्यात आली आहे. तर ही जागा देण्यास विरोध केल्याने तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आल्याचं देखील वडेट्टीवार म्हणाले.

वसंत तात्या ‘या’ दिवशी बांधणार ठाकरेंचं शिवबंधन

मात्र भाजपचा नीट बोलता येत नाही. जरा तोत्रच बोलणारा नेता म्हटला की, एक इंच ही जागा दिली नाही. मात्र मिठागराची जागा देखील बिल्डरला देण्यात आली. असं म्हणत वडेट्टीवार यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील टीका केली. दरम्यान सोमय्या यांच्याकडून नेहमीच विरोधी पक्षातील विविध नेत्यांच्या गैरव्यवहारांवर पत्रकार परिषदा घेत आरोप केले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img