22.6 C
New York

Maharashtra Legislative Council : आज ‘हे’ 15 आमदार विधान परिषदेतून निवृत्त होणार

Published:

आज (4 जुलै) 15 आमदार महाराष्ट्र विधान परिषदेतून(Maharashtra Legislative Council Election) निवृत्त होत आहेत. यामधील तीन आमदार पुन्हा एकदा निवडणूक जिंकून सभागृहामध्ये परतले आहेत, तर दोन आमदार आगामी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अनिल परब, निरंजन डावखरे आणि किशोर दराडे यांनी निवडणूक जिंकली आहे. प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषदेने निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.

Maharashtra Legislative Council आज निवृत्त होणारे सदस्य

1) विलास पोतनीस 2) कपिल पाटील 3) महादेव जानकर 4) मनीषा कायंदे 5) भाई गिरकर 6) बाबाजानी दुर्राणी 7) नीलय नाईक 8) रमेश पाटील 9) रामराव पाटील 10) वजाहत मिर्झा

Maharashtra Legislative Council विधान परिषदेत महत्त्वाचं काय आहे?

अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कार्यकाळ कमी होणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील अंबादास दानवे यांच्या बाबत दुपारी दोन पर्यंत काय निर्णय घ्यायचा हे सत्ताधारी पक्षाची बाजु काय असेल याबाबत सभागृहाला अवगत करतील. त्यानंतर नीलम गोरे या संदर्भात निर्णय घेणार आहेत.

प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एसटीचं ‘प्रवासी राजा दिन’

राज्यात भरधाव गाडीमुळे झालेल्या अपघातांबाबत विरोधी पक्षाची लक्षवेधी असणार आहे यामध्ये कल्याणी नगर पोर्शे अपघात प्रकरण, जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे सात मे रोजी श्रीमंतांच्या दोन मुलांनी मध्ये धुंद अवस्थेतएकाच कुटुंबातील चार जणांचा कारचेरीस खेळताना दिलेल्या धडकेत झालेला मृत्यू सहर घटना घडवून एक महिना लुटला तरी संशयीतांना अद्याप अटक नाही, नागपूर येथील वाटोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ एका कारचालकाने मद्यधुंद अवस्थेत 9 जणांना चिरडले ची 16 जून रोजी ची घटना या घटनेत दोघांचा मृत्यू पाच जण गंभीर जखमी यामध्ये एका लहान मुलीचा व मुलीचा जागीच मृत्यू या प्रकरणातील आरोपीसुद्धा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा समोर मात्र अद्याप या प्रकरणात ही कारवाई नाही. अशा तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर आमदार विलास पोतनीस एकनाथ खडसे सुनील शिंदे भाई जगताप यांनी लक्षवेधी मांडली आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्हीआयटीचाळीत असलेल्या निवासस्थानाचा आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा मागच्या सरकारच्या काळात झाली होती मात्र तीन वर्षानंतर ही हे स्मारक कागदावरच असल्याचे समोर येणे. याबाबत भाई गिरकर यांची लक्षवेधी महत्त्वाची आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img