23.1 C
New York

Pandharpur Wari : पंढरीची वारी टोलमुक्त, करावं लागल ‘हे’ काम

Published:

मुंबई

अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचे वेड (Pandharpur Wari) लागलं असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्यादिशेने टाळ मृदुंगाचा गजर करत, मुखी हरीनाम जपत दिंड्या पंढरीकडे (Pandharpur) निघाल्या आहेत. यानिमित्त राज्य सरकारने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वारकरी विठू भक्तांसाठी टोल माफी जाहीर केले आहे. ही टोल माफी (Toll Free) मिळण्याकरिता आरटीओ (RTO) कार्यालया मधून वाहन चालक प्रवाशाला पास बनवणे बंधनकारक असणार आहे. 21 जुलै पर्यंत असणार आहे.

पंढरपूरला आषाढी कार्तिकी निमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना पथ करातून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत. वारीच्या कालावधीत पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमतो. कार, बससह विविध वाहनांतून वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने चंद्रभागेच्या तिरी जमतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे. विशेष म्हणजे 3 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत असणार आहे.

यंदा खूप लवकर टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जे वाहनाने जाणारे वारकरी आहेत त्यांच्याकडे कारचे आरसी, पीयुसी, इन्शुरन्स ही कागदपत्रे असतील तर आरटीओत जाऊन अर्ज भरून टोलमाफी घेण्याची संधी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एसटी बसला देखील टोलमाफी जाहीर केलेली आहे. तसेच गरज असेल तर अवजड वाहतूकही थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यातून पांढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही पथकरातून सूट देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img