19.7 C
New York

Devendra Fadnavis : थोरातांना उत्तर देत फडणवीसांनी फटकारले

Published:

पेपरफुटीवरुन आरोप करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आकडेवारीसह उत्तर देत चांगलेच फटकारले आहे. आमच्या सरकारने विनाघोटाळा करत 77 हजार पदं भरत रेकॉर्ड केलायं असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज (दि.1) विधानसभेत सांगितले. ते पेपर फुटीवरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोलत होते. यावेळी फडणवीसांनी तलाठी भरती रद्द का केली याचेही सविस्तर उत्तर दिले. (Devendra Fadnavis On Paper Leak Issue In Maharashtra Assembly Session )

Devendra Fadnavis सभागृहात नेमकं काय घडलं?

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीच्या (Paper Leal) मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना थेट आकडेवारी सांगत प्रत्युत्तर दिले. पेपरफुटीने पास होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नीटबाबतही हेच सुरु आहे. सरकार कठोर कारवाई करायला तयार नाही अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली. त्यावर फडवीसींनी वरील उत्तर दिले आहे.

‘नीट’च्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ, विरोधकांनी केला सभात्याग

Devendra Fadnavis तलाठीचा पेपर फुटला नाही तर..

तलाठी भरती रद्द का केली याचेही फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिले. ते म्हणाले की, तलाठी पेपरभरती पेपर फुटला नाही, उत्तराची पद्धत चुकली होती. त्यामुळे परीक्षा रद्द केली. समान मार्क उत्तर चुकलं असेल तर दिले जातात, त्यावर ओरड झाली , त्यामुळे पेपर रद्द केला, असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis घडलं काय आणि नरेटिव्ह काय?

थोरातांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, पेपरफुटीबाबत घडलं काय आणि काय नरेटिव्ह पसरवले जात आहे, यात फरक आहे. यावरून मला राजकारण करण्याची इच्छा नाही असे म्हणत मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशाप्रकारे फुटलं याची जंत्री मी आणली आहे. पण मी त्याबाबत बोलणार नाही. विरोधी पक्षाकडून अशाप्रकारची बेताल वक्तव्यं केली जातात तेव्हा तरुणांमध्ये गैरसमज पसरतात असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis आम्ही भरतीचा रेकॉर्ड केलायं

आमच्या सरकारच्या काळात राज्यात विक्रमी नोकरभरती झाल्याचा दावाही केला. 75 हजार नोकरभरतीचे लक्ष्य आपण ठेवले होते. 57, 422 नियुक्तीचे आदेश आमचे सरकार आल्यानंतरदेण्यात आले. तसेच ज्यांची परीक्षा पूर्ण झाली, कागदपत्रे पूर्ण झाली अशांची संख्या 19853 इतकी आहे. ही एकूण संख्या 77, 305 इतकी आहे. ही सगळी पदं कुठल्याही घोटाळ्याविना भरली गेली. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड असल्याचे फडणवीस म्हणाले. आणखी 31,201 पदं भरण्याची प्रक्रियाही सुरु आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img