21 C
New York

IND vs SA Final : पीएम मोदींनी केले टीम इंडियाचे अभिनंदन

Published:

नवी दिल्ली

टी 20 वर्ल्डकपमध्ये विजय साकारत टीम इंडियाने अकरा वर्षांचा (IND vs SA Final) दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करत थरारक पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. T20 क्रिकेट (ICC T20 World Cup) विश्वचषक स्पर्धेत भारताने विजय मिळवला आहे या विजयानंतर भारतीय संघाच्या संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर (IND vs SA Final) विजय मिळवत T20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले असून देशातील 140 कोटी देशवासीयांना आज अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे.

भारतीय संघाच्या विजयानंतर पीएम मोदी म्हणाले की, या शानदार विजयाबद्दल सर्व देशवासियांच्या वतीने टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन. आज 140 कोटी देशवासीयांना तुमच्या या शानदार कामगिरीचा अभिमान वाटत आहे. तुम्ही विश्वचषक जिंकला. क्रीडा क्षेत्र, पण तुम्ही भारताच्या प्रत्येक गल्लीत आणि परिसरातील लाखो देशवासीयांची मने जिंकलीत आणि ही स्पर्धा सुद्धा एका खास कारणासाठी लक्षात राहील, इतके देश, इतके संघ आणि एकही सामना हरला नाही एक छोटीशी उपलब्धी, तुम्ही क्रिकेट जगतातील प्रत्येक चेंडू खेळला, मी तुमचे खूप अभिनंदन करतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img