23.1 C
New York

IND vs SA Final : रोहित-विराटचा आज अखेरचा सामना ?

Published:

भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक (T20 World Cup 2024) पटकावण्याच्या मार्गावर आहे. बार्बाडोस येथे खेळल्या जाणाऱ्या 2024 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA Final) होणार आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 6 विकेट्ने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आज दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून भारताला जेतेपदावर आपलं नाव कोरण्याची संधी आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. भारताने 2007 पाकिस्तानला पराभूत साली टी-20 विश्वचषक जिंकला होता. तर 2014 साली अंतिम सामन्यात भारतीय संघ दाखल झाला होता.

टी-20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताचीटी-20 विश्वचषकात फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी-20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.

पैसाच पैसा! टी 20 विजेता संघ होणार मालामाल

भारताने 2007 पाकिस्तानला पराभूत साली टी-20 विश्वचषक जिंकला होता. तर 2014 साली अंतिम सामन्यात भारतीय संघ दाखल झाला होता. यावेळी बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला इतिहास रचण्याची संधी आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने रोहित शर्माला एक सल्ला दिला आहे. टीम इंडिया संपूर्ण विश्वचषकात अपराजित आहे, त्यामुळे त्यांना काहीही बदल करण्याची गरज नाही. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला उत्तम प्रदर्शन करावं लागणार आहे. जर प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली, तर टीम इंडियाला पराभूत करणं अवघड जाणार असल्याचं रिकी पाँटिंग म्हणाला.

IND vs SA Final रोहित-विराटचा आज अखेरचा सामना?-

भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘टी-20’ विश्वचषकाचा अंतिम सामना खेळून या प्रकाराला अलविदा करू शकतात. काही महिन्यांआधी फायनल गमावताच दोघांच्या डोळ्यांत दुःखाचे अश्रू तरळले होते. आज डोळ्यांत अश्रू यायला हवेतः पण ते आनंदाचे! रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने फायनल जिंकून विश्वचषक दिमाखात उंचवावा, अशी प्रत्येक चाहत्याची मनोमन इच्छा आहे. बीसीसीआय आणि निवडकर्ते फायनलनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना या प्रकारात संधी देणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img