23.1 C
New York

Jayant Patil : नरेटिव्ह नाही तर ही महाराष्ट्राची खंत, पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Published:

मुंबई

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशी गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक पाहाणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यावर खोटे बोलायचे तरी किती? अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. तर, नरेटिव्ह नाही तर ही महाराष्ट्राची खंत, असल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केला आहे.

फडणवीस यांच्या या ट्वीटवर जयंत पाटील यांनी पुन्हा ट्वीट करत पलटवार केला आहे. मोठ्या आणि मध्यम राज्यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच पहिल्या 2-3मध्ये असायचा. भाजपाची राजवट 2014-15ला आली आणि आपण मुख्यमंत्री झालात. त्यानंतर फक्त दोन वर्षांत 2017-18मध्ये गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला. तो कायम पुढे राहिला आहे आणि हा नरेटिव्ह नाही तर ही संपूर्ण महाराष्ट्राची खरी खंत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

जयंत पाटील यांचे उत्तर

देवेंद्रजी,

मोठ्या व मध्यम राज्यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच पहिल्या २-३ मध्ये असायचा. भाजपची राजवट २०१४-१५ ला आली व आपण मुख्यमंत्री झालात फक्त २ वर्षात २०१७-१८ मध्ये गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला व तो कायम पुढे राहिला आहे व हा NARRATIVE नाही तर ही अख्या महाराष्ट्राची खरी खंत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

जयंतराव,
खोटे बोलायचे तरी किती?
बाकीच्यांनी खोटा नरेटिव्ह पसरविला, तर समजू शकते. पण, दस्तुरखुद्ध राज्याचे माजी अर्थमंत्री तेच करीत असतील, तर काय म्हणावे?
महाविकास आघाडीचा काळ आठवून पहा…
2020-21 : 1,82,454 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)
2021-22 : 2,19,573 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)
आणि आता
2022-23 : 2,52,389 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)
आपल्या बाकीच्याही आरोपांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलतीलच.
पण, महाराष्ट्राची बदनामी किमान आपल्या हातून तरी होऊ नये, ही अपेक्षा!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img