26.6 C
New York

INDvsENG: भारताने इंग्लंडला लोळवत केली वर्ल्डकप फायनलमध्ये एंट्री

Published:

भारत विरुद्ध इंग्लंड(INDvsENG) उपांत्य फेरीमधील हाय व्होल्टेज सामना भारताने सहज आपल्या खिशामध्ये घालत टी२० वर्ल्डकपच्या अंतिममध्ये सहज एन्ट्री केली. पावसाचे सावट असलेल्या या सामन्यामध्ये भारताने पहिल्यापासूनच आपला दबदबा ठेवला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण करून मोठी चूक केली असे स्पष्ट झाले. भारतीय कर्णधार सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अर्धशतक झळकावले. कोहली या सामन्यातदेखील मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार आणि रोहितने डावाला चांगला आधार दिला. भारताने इंग्लंडला १७२ धावांचे मोठे आव्हान दिले.
इंग्लंडच्या संघाला धारातीर्थी पाडण्यासाठी भारताने सुरुवातीपासूनच फिरकीपटूंना आणत चकित केले. इंग्लिश खेळाडू भारतीय फिरकी माऱ्यासमोर सपशेल गार झाले. एकामागोमाग एक महत्वाचे खेळाडू बाद झाल्याने भारताची सामन्यावर पकड मजबूत झाली. इंग्लंड भारताने उभ्या केलेल्या आव्हानासमोर फक्त १०३ धावा करू शकली.

(सविस्तर वृत्त थोड्या वेळात)

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img