26.6 C
New York

bigg boss ott 3: “हे गलिच्छ मनोरंजन आहे”, देवोलिना भट्टाचार्जीचा तो ट्विट व्हायरल

Published:

bigg boss ott 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ (Big Boss OTT 3) हा सिझन दणक्यात सुरु झाला आहे. यंदाचा सिझन जास्तच चर्चेत आलेला आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेला युट्यूबर अरमान मलिक (Arman Malik) त्याच्या दोन पत्नींसह सहभागी झाला आहे. युट्यूबर अरमान मलिकने पायल आणि कृतिका या दोन पत्नींसह ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केली आहे. पण, २ पत्नीं असलेल्या अरमानला ‘बिग बॉस’ च्या घरात पाहून सिरीयल अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने (Devolleena Bhattacharjee) संताप व्यक्त केला आहे. देवेलीनाने X वर ट्वीट करत त्याच्यावरचा राग व्यक्त केला आहे.

bigg boss ott 3: “तुम्हाला वाटत की हे सर्व मनोरंजन आहे?, हे एकदम गलिच्छ मनोरंजन आहे. हे हलक्यात घेण्याचा विचार सुद्धा करू नका. कारण, ही काय रील नाही तर ही तुमची रियल लाईफ आहे. या निर्लज्जपणाला कोणी मनोरंजन कसं बोलू शकतं? हे मला कळत नाहीये. मला हे ऐकूनच कस तरी वाटलंय. ६-७ दिवसात प्रेम होणं, मग लग्न होतं.. आणि हीच गोष्ट बरोबर पत्नीच्या बेस्टफ्रेंडबरोबर होते. आणि हे सर्व खरंच माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे.”

 बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी रणवीर शौरी असं का म्हणाला ?

bigg boss ott 3: “आणि बिग बॉस तुम्हाला काय होतंय? तुमच्यावर इतके वाईट दिवस का? की तुम्हाला हा दोन पत्नी असलेला माणूस खरंच मनोरंजक वाटतो? अशा स्पर्धकाला तुम्ही आणताना नक्की काय विचार करता? लहान मुलांपासून ते अगदी जेष्टांपर्यंत हा शो पहिला जातो. दोन आणि ३ लग्न करू शकतो हे तुम्ही नवीन पिढीला शिकवू इच्छिता का? सगळे खुश आनंदात राहू शकता ? ज्या लोकांनी खरंच या गोष्टी अनुभवल्या आहेत ज्यांना सामना करावा लागलाय, एखादा त्यांना जाऊन विचारा.”

“यासाठी वैवाहिक कायदा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड(UCC) अत्यंत गरजेचं आहे. सर्वांसाठी हा कायदा एकच असेल आणि समाज अशा घाणेरड्या गोष्टींपासून दूर राहील, पहिली बायको असून दुसरी पत्नी… समानतेच्या नावाखाली जर २-२ पती महिलेने केले तर तसं चालेल का?”

“अरमान मालिकांचे फॉलोवर्स कोण आहेत? हेच मला काळात नाहीये. आणि ते त्याला फॉलो का करतात? तुमचं डोकं ठीक आहे का ? कि नाही ? नसेल तर उचाराची गरज आहे तुम्हाला. जर तुम्हाला हा निर्लज्जपणा आवडत असेल तर तुमचं आयुष्य निरर्थक आहे. यापलीकडे जाऊन तुम्ही कोणताच विचार करू शकणार नाही आणि याबाबत काही करू सुद्धा शकत नाही. तुम्ही अनेकजण लग्न करू शकता, नवीन पिढीला तुम्हाला हीच शिकवण द्यायची आहे? आणि खरंच २-३ लग्न कारण हे खरंच महत्वाचं असेल तर करा आणि घरी बसा. हा गलीच्छ विचार समाजामध्ये पसरवू नका. लोक वेडे झाले आहेत. खरं तर बिग बॉस मला कळत नाहीये की तुमहाला काय झालंय… देवोलिनाचं हे ट्विट बऱ्याच प्रमाणात व्हायरल झालं आहे. या ट्विटवर कमेंट करत चाहत्यांनी तीच समर्थन केल्याचं पाहायला मिळतंय.”

दरम्यान, अरमान मलिक बद्धल बोलायचं झालं तर तो एक प्रसिद्ध युट्युबर आहे, त्याचे युट्युबवर ७ मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत.अरमान मलिक हा त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. २०११ मध्ये त्याने पायल मलिकशी लग्न केलं होत. आणि त्याला तिच्यासोबतचा चिरायू नावाचा मुलगा आहे. त्यानंतर २०१८ मध्ये पायलची बेस्टफ्रेंड असलेल्या कृतिकाच्या प्रेमात अरमान पडला आणि तिच्याशी दुसरं लग्न केलं. अरमानच्या दोन्ही पत्नी एकाच वेळेस प्रेग्नन्ट असल्याने मलिक कुटुंब चर्चेत आलं होतं. अरमान मलिकला त्याच्या दोन्ही पत्नींपासून ४ मुले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img