17.4 C
New York

Water Shortage : मराठवाड्यातील पाणीटंचाई कधी संपणार?

Published:

राज्यात पावसाला सुरूवात झाली असली तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई काही कमी होताना दिसत नाही. पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पाण्यासाठीची वणवण काही कमी होईना. (Marathwada) मराठवाड्यात पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठली (Water Shortage ) असली तरी आजही सुमारे २० लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर तहान भागवत असल्याचं विदारक चित्र मराठवाड्यात आहे.

Water Shortage पाणीटंचाईकडं कुणाच लक्ष नाही

हे पाणीटंचाईचं संकट कधी कमी होणार याची प्रतिक्षा करत मराठवाड्यातील १३६० गावे ५८३ वाड्या १९३८ टँकरने येणाऱ्या पाण्याने आपली तहान भागवत आहेत. मराठवाडा विभागातील सुमारे १० टक्के जनता पाण्यासाठी वणवण करत आहे. निवडणुकीची रणधुमाळी संपली, निकाल लागला. केंद्रात सरकार स्थापन झालं. जय-पराजयाचं एकमेकांवर खापर फोडून झालं. मात्र, पाणीटंचाईकड काही कुणाच लक्ष गेलं नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावं आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता. १९३८ टँकरचा आकडा आता १९ जूनपर्यंत आहे.

Water Shortage वाढता वाढले टँकर

जानेवारी महिन्यात जालना जिल्ह्यात ७६ टँकरने, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९ पाणीपुरवठा सुरू होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर गेली. टँकरचा आकडा मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १८३७ वर गेला. जून महिन्यात १९३८ टँकर सुरू झालं. ४२२१ विहिरींचे अधिग्रहण केलं आहे.

नगरमधील ‘या’ कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

Water Shortage विभागीय आयुक्त कधी मिळणार

शासनाने मंगळवारी सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. परंतु, १८ दिवसांपासून मराठवाडा विभागीय आयुक्तपद रिक्त आहे. आयुक्तांची नियुक्ती किमान टंचाईचा विचार करून तरी लवकर करावी, अशी विरोधकांची मागणी आहे.

Water Shortage १३६० गावं, ५८३ वाड्यांवर टंचाई

सध्या १३६० गावं आणि ५८३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. सुमारे २० लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले आहेत. टँकरची संख्या रोज वाढत आहे. नियमित पावसाळा झाला आहे. सध्या मात्र ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. ४७५ गावे व ७५ वाड्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, ३३४ गावे व ८१ वाड्या जालना, २३ गावे व ७ वाड्यापरभणीत, ५ गावे व ५ वाड्या हिंगोली, ११ गावे आणि २९ वाड्यानांदेड, ३८३ गावे व ३५८ वाड्याबीड, ३१ गावे आणि १६ वाड्या लातूर तर धाराशिव जिल्ह्यात ९९ गावांत टंचाई आहे.

Water Shortage जिल्हानिहाय टँकर संख्या

छत्रपती संभाजीनगर – ७४२
जालना – ५१३
परभणी – ३१
हिंगोली – १०
नांदेड – ३९
बीड – ४३६
लातूर – ४४
धाराशिव – १२३
एकूण – १९३८

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img