22.3 C
New York

Ajit Pawar : शिखर बँक क्लीन चिट प्रकरण अजित पवार विरोधात अण्णा हजारे जाणार कोर्टात

Published:

मुंबई

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (Maharashtra State Cooperative Bank) घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळालेल्या क्लीन चिटवर हरकत घेतली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टला न्यायालयात आव्हान देणार असून, यामुळे अजित पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होणार आहे.

शिखर बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एक क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व इतर आरोपींना क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणी या आरोपींविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असे ईओडब्ल्युने म्हटले होते. आता अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. कोर्टानेही त्यांचा आक्षेप मान्य करत त्यांना याचिका दाखल करण्यास पुरेसा वेळ दिला आहे. त्यानुसार येत्या 29 तारखेला या प्रकरणी पुढील सुनावणी होईल.

काय आहे प्रकरण

साल 1961 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी काही सूत गिरणी आणि साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे वाटली. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड नुकसान होऊन ती डबघाईत गेली आहे. या संचालक मंडळामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण अशा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा तर शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांचाही समावेश आहे. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकेमार्फत केली गेली होती. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं ऑगस्ट 2019 मध्ये याप्रकरणी संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश तपासयंत्रणेला दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्देशांविरोधात वसंतराव शिंदे, अमरिश पंडी, निलेश सरनाईक, सिद्धरामप्पा अलुरे, आनंदराव अडसूळ आणि रामप्रसाद बोर्डीकर यांनी या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र याप्रकरणी हायकोर्टानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यासाठी दिलेले आदेश योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं

त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 25 हजार कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 420, 409, 406, 465, 467, 468, 34, 120 (ब) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात केला. या यादित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार हडकंप झाला होता. या राज्य घोटाळ्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली गेली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img