23.1 C
New York

 Bacchu Kadu : बच्चू कडू वाढवणार महायुतीचं टेन्शन ?

Published:

प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू  (Bacchu Kadu)  यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला. त्यामुळे अवघ्या काही मतांनी नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. बच्चू कडू हे महायुतीचे घटक आहेत. असं असतानाही त्यांनी राणा यांचा पराभव घडून आणल्याने महायुतीत एकच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांनी आता निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. महायुतीचं बच्चू कडू यांचं हा निर्णय टेन्शन वाढवणारा आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचं मन वळवण्यात यशस्वी होतात महायुतीचे नेते का हे पाहावं लागणार आहे. मीडियाशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 20 ते 25 जागांवर उमेदवार येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही उभे करणार आहोत. अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत.

 Bacchu Kadu  रवी राणांची भाषा योग्य नव्हती

खासदार बळवंत वानखडे हे बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन केलं आहे. जात प्रमाणपत्र बाबत न्यायालयाने नवनीत राणा यांच्याबाबत चुकीचा निर्णय दिला. ही निवडणूक धर्मावर झाली. आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्दावर निवडणूक लढलो. आमच्याच उमेदवारीमुळे नवनीत राणा पराभूत झाल्या यात फार तथ्यही नाही. उमेदवारीला भाजपने विरोध केला तरी उमेदवारी दिली त्यात रवी राणाची भाषा योग्य नव्हती. रवी राणा हे आम्हाला घरी येऊन मारण्याच्या धमक्या देतात आणि त्यांचं काम आम्ही करायचं का? आम्हाला एवढं अपमानित होऊन जगता येत नाही , असं बच्चू कडू म्हणाले.

इंडिया आघाडीने टाकला होता मोठा डाव…

 Bacchu Kadu  बैठकीचं निमंत्रण कसे देतील?

पराभव हा बच्चू कडू यांनी केला असं वाटत असेल तर आपण कसे वागलो याच विचार करावा, असा सल्लाही बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना दिला. अमरावतीचा उमेदवार आम्ही पाडला असं ते म्हणत आहेत. मग ते आम्हाला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण कशी देतील?, असा सवाल त्यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img