21 C
New York

Election Results : हनुमानानंतर भाजपवर रामही रुसला

Published:

कर्नाटक, आणि मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये Election Results भाजपने जय हनुमान म्हणत मतदान करा, असे भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रचारा दरम्यान म्हंटले होते. मात्र कर्नाटकात या घोषवाक्याचा प्रथम प्रयोग करण्यात आला होता. त्याच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यानंतर विरोधकांनी भाजपचा हनुमानाने पराभव केला असं विरोधक बोलत होते. यंदा भाजपाने लोकसभा प्रचारा दरम्यान राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता मात्र त्याचाही काहीसा फायदा भाजपाला झाल्याचं दिसून येत नाही आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) देशात जाहीर होत आहे. मात्र या निकालात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला असून भाजपला बहुमत मिळवण्यासाठी देखील अवघड होत आहे. भाजपने 400 पारचा नारा लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी दिला होता मात्र भाजपला जाहीर झालेल्या निकालात बहुमत मिळताना दिसत नाही.

1 जून रोजी देशात लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए (NDA) सहज 350 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र तसा काहीच झाला नाही. यामुळे आता भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी बिहारचे मुख्यंमत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे मात्र भाजपला इतक्या कमी जागा का? मिळाले याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. भाजपने गेल्या पाच वर्षात अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण केला आणि त्यात र कलम 370 रद्द केला मात्र तरीही निकाल भाजपच्या विरोधात जाण्याची कारणे कोणती होती ते जाणून घ्या.

Election Results अतिआत्मविश्वास

भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दिला होता याच बरोबरराम मंदिराच्या उभारणीनंतर जानेवारी महिन्यात देशात निर्माण झालेला वातावरण भाजपच्या पक्षात जाणार असा विश्वास भाजपला होता. मात्र हाच अतिआत्मविश्वास भाजपला बळी ठरला. यावेळी भाजपला उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या राज्यात भाजपला यश मिळणार असल्याचा विश्वास भाजपला होता.

‘त्या’ फॅक्टरचा भाजपला विदर्भात धक्का

Election Results राममंदिराच्या मुद्द्याचा काही फायदा झाला नाही

जानेवारी महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर देशात ही पहिली लोकसभा निवडणूक होती आणि या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा होती मात्र असे असतानाही यूपीमध्ये भाजपचे मोठे नुकसान झाले. निकाल पाहता भाजपला राम मंदिराच्या उभारणीचा फायदा झाला नसल्याचे दिसून येते. फैजाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत अयोध्या येते, भाजप उमेदवाराचा तेथेही पराभव झाला.

Election Results संविधान धोक्यात

इंडिया आघाडीकडून ‘आरक्षण, संविधान धोक्यात’ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यामुळे भाजपला 400 पेक्षा जास्त जागा पाहिजे अशा मुद्यावर जोर देण्यात आला होता. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी विरोधकांच्या या मुद्याला छेद देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात त्यांना पूर्ण यश आले नसल्याचे दिसते.

Election Results अग्निवीरची अग्निपथ योजना, वारंवार पेपर फुटल्याने तरुणांमध्ये संताप!

देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपची अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी होत होती. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यातच मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठा मुद्दा बनवला ही योजना सत्तेत येताचसंपवू,असे आश्वासन दिले. तसेच पेपर फुटणे आणि बेरोजगारी हा मोठा मुद्दा उत्तर प्रदेशात बनवत राहुल गांधी यांनी भाजप विरोधात संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये जोरदार प्रचार केला होता. भाजपच्या निराशाजनक कामगिरीमागे यूपीमध्ये हेही एक प्रमुख कारण असू शकते.

Election Results मोदींच्या नावाने जिंकता येणार नाही

भाजपने मोदी यांच्या नावावर गेल्या निवडणुकीप्रमाणे देखील यावेळी मत मागितले होते मोदी मॅझिक मात्र यावेळी दिसून आला नाही. गेल्या वेळेच्या तुलनेत खूपच कमी फरकाने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील यावेळी विजय झाला आहे. तर दुसरीकडे, भाजपला यावेळी स्थानिक पातळीवर उमेदवारांविरुद्धचा जनक्षोभ महागात पडला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img