21 C
New York

Sanjay Raut : मोदींचा निरोप समारंभ सुरू झाला, राऊतांचं वक्तव्य

Published:

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election2024 Result ) मतमोजणी केली जात आहे. एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) यावेळी भाजपची एकहाती सत्ता येईल, असे भाकित वर्तवण्यात आले होते. 2 वाजता चित्र स्पष्ट होईल,परंतु आतापर्यंत जे सुरू आहे त्यानुसार नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ सुरू झाला, असंही ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election Result 2024 Preparations for Narendra Modi s farewell ceremony begin Sanjay Raut )

Sanjay Raut काय म्हणाले संजय राऊत ?

नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून उभे आहेत. ते काशीपुत्र आहेत. तेथेदेखील नरेंद्र मोदी तीनवेळा पिछाडीवर आहेत. साधारण दोन वाजता चित्र स्पष्ट होईल. या क्षणी आघाडी ही झपाट्याने पुढे जात आहे. एक्झिट पोलचे जे आकडे आले होते ते इंडिया आघाडीने पार केले आहेत. इंडिया आघाडी खूप पुढे गेली आहे. माझ्या आकलनानुसार, काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील. ज्या काँग्रेस पक्षाला मागच्या निवडणुकीत 50 जागाची मिळाल्या नव्हत्या. तोच पक्ष आता 150 जागांच्या पुढे जाऊ शकेल असं मला वाटते

शरद पवारांची 10 पैकी 10 जागांवर आघाडी

काँग्रेसचं 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो. जो आमचा अभ्यास आहे, त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील आणि देशात इंडिया आघाडी 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल. भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला बहुमत मिळेल असं मला दिसत नाही. पण यावर चर्चा करण्यासाठी अद्याप वेळ आहे.

Sanjay Raut महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे

महाराष्ट्रात पहिल्या निवडणूक निकालातील कल पाहता महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. नंदूरबारमध्ये काँग्रेस उमेदवार 1 लाख मतांनी निवडून येतील. तर, बीडमध्येही बजरंग बप्पा पुढे आहेत, मुंबईतही शिवसेना मोठा विजय मिळवत आहे, असे राऊत यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img