22.3 C
New York

Lok Sabha Elections : लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात ६० टक्के मतदान

Published:

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडली. त्यातील शेवटचा टप्पा काल झाला. यामध्ये काल शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ६० टक्के मतदानाची प्राथमिक नोंद झाली. या टप्प्यासाठी आठ राज्यांतील वाराणसीसह ५७ जागांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ४ जूनपर्यंत सुमारे आठ हजार ३६० उमेदवारांचं भवितव्य मतयंत्रामध्ये बंद झालं.

Lok Sabha Elections या राज्यांचा समावेश

गेल्या शनिवारी (२५ मे)रोजी सहाव्या टप्प्यात ६३.३६ टक्के मतदान झालं होतं. त्यापूर्वी पाचव्या टप्पा २० मे रोजी झाला होता. त्यामध्ये ६२.२ टक्के इतकंच मतदान झालं आहे. शेवटच्या टप्प्यात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि चंडीगडसह आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत मतदान झालं. पंजाबमधील १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल नऊ, बिहार आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन आणि चंडीगडच्या जागेसाठी मतदान पार पडलं.

Lok Sabha Elections सर्वाधिक मतदान

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार रात्री ८ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ६९.८९ टक्के मतदान झालं आहे. सर्वांत कमी सुमारे ५० टक्के मतदानाची नोंद बिहारमध्ये झाली. झारखंडमध्ये ६९.०३ टक्के, हिमाचल प्रदेश ६७.४०, चंदीगड ६३, ओडिशा ६३.४२, पंजाब ५५.७० आणि उत्तर प्रदेशमध्ये ५५.९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अंतिम आकडेवारी आयोगाच्या वतीने देण्यात आलेले नाही.

पहिलं इलेक्शन अन् जमलं कंपन्याचं टायमिंग

Lok Sabha Elections बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना

या काळात पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातही हिंसाचाराच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. ईव्हीएममध्ये बिघाड, एजंट लोकांनी मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणे, मतदानकेंद्रे तलावात फेकून देणे आणि मतदारांना धमकावल्याचे आरोप अशा अनेक घटना येथे घडल्या. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि भाजपचे अमित मालवीय यांनी बंगालमधील संदेशखाली येथे आंदोलन करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

Lok Sabha Elections आधीच्या टप्प्यांतील मतदानाटी टक्केवारी

पहिला -६६.१४
दुसरा – ६६.७१
तिसरा – ६५.६८
चौथा – ६९.१६
पाचवा -६२.०२
सहावा – ६३.३६

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img