26.6 C
New York

Jayakwadi Dam : जायकवाडीत जलसमाधी मिळालेले मंदिर उघडे; ५० वर्षांत दुसऱ्यांदाच दर्शन

Published:

उमेश पठाडे/ छत्रपती संभाजीनगर

जायकवाडी धरणाचे (Jayakwadi Dam) पाणी झपाट्याने कमी झाल्यामुळे‎ अनेक वर्षांपूर्वीचे मंदिर उघडे झाले आहे. ५० वर्षांपूर्वी‎ जलसमाधी मिळालेले मंदिर दिसू लागल्यामुळे जुन्या‎ आठवणी जाग्या झाल्या आहेत. नगर व संभाजीनगर‎ जिल्ह्यातील धरणाच्या पट्ट्यात खडकुली या ठिकाणचे ‎चक्रधर स्वामी यांचे मंदिरदेखील उघडे पडले आहे.‎

Jayakwadi Dam : चक्रधर स्वामींचे मंदिर पाहण्यासाठी गर्दी

गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरण बांधले‎ गेले. सन १९६५ मध्ये धरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ‎२३ मे १९७४ साली धरणात पहिल्यांदाच पाणी‎ साचवण्यास सुरुवात झाली हाेती. यापूर्वी सन २०१८ ‎मध्ये धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यात आल्यानंतर‎ मंदिरे उघडी पडली होती. त्यानंतर आता सहा वर्षांनंतर पुन्हा उघडी पडली आहेत. आता अनेक वर्षांनंतर‎ जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी खालावली‎ आहे. काही जुने रस्तेदेखील उघडे पडले असल्याचे ‎अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. चक्रधर‎स्वामींचे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी रविवारी‎ येथे गर्दी केली होती.‎

हेही वाचा : लोकदैवत खंडोबाचा गाभारा मोगरा फुलांनी सजला

Jayakwadi Dam : धरणात केवळ 5 टक्के पाणीसाठा

चक्रधर स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली येथून भाविक यायचे. ‎या धरणामुळे प्राचीन हेमाडपंती मंदिरास जलसमाधी‎ मिळाली होती. यात चक्रधर स्वामी, महादेव मंदिरासह‎ मुस्लिम धर्माच्या मशिदीलाही जलसमाधी मिळाली होती.‎ आता धरणाचा पाणीसाठा ५ टक्के झाला असल्याने ही मंदिरे‎ उघडी पडत आहेत. यामुळे ५० वर्षे पाण्यात लाटांशी झुंज‎देणारे हे मंदिर उघडे झाले आहे.‎ जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले की‎ धरणाचा पाणीसाठा आणखी कमी झाल्यास आणखी मंदिरे इतर ठिकाणी‎ उघडी पडतील. नागरिकांनी हे बघण्यासाठी आले तरी पाण्यात जाऊ नये,‎ असे आवाहन त्यांनी केले.‎ चक्रधर स्वामी यांचे मंदिरदेखील उघडे पडले आहे.‎

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img