25.1 C
New York

Vidhanparishad : विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा

Published:

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद Vidhanparishad निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या (vidhanparishad) 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 26 जून रोजी मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

मुंबई (Mumbai) आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच चारही विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार होते. यापूर्वी मतदानाची तारीख 10 जून निश्चित झाली होती. मात्र, आता नवीन कार्यक्रमानुसार ह्या निवडणुकात 26 जून रोजी होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होत आहे.

दुष्काळी परिस्थिती वरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Vidhanparishad पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरणार
10 जून रोजी अर्जाची छाननी
12 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
26 जून रोजी मतदान होणार
1 जुलै रोजी होणार मतमोजणी

Vidhanparishad अर्ज कधी करता येणार?

विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 31 मे ते 7 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. यानंतर 10 जून रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी होईल आणि 12 जूनपर्यंत उमेदवारांना त्यांचा अर्ज मागे घेता येईल. यानंतर 26 जून रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Vidhanparishad निवडणुका पुढे ढकलण्याचे कारण?

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी याआधी 10 जून रोजी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने 10 जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा दावा करत ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य करत विधान परिषदेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. पण आता निवडणूक आयोगाने नव्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img