23.1 C
New York

Sanjay Dutt: संजय दत्तने ‘वेलकम टू जंगल’मधून केले बॅकआऊट!

Published:

‘वेलकम’ सिनेमाच्या ‘वेलकम टू द जंगल’च्या तिसऱ्या भागाबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय दत्तने Sanjay Dutt या सिनेमातून माघार घेतल्याची माहिती सध्या समोर आली आहे. ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता दिसून येत आहे. या सिनेमाविषयीची खाशियत अशी आहे की या सिनेमात मल्टीस्टार ने अभिनय केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तने चित्रपटातून माघार घेतली आहे.

अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, संजय दत्तसह अनेक स्टार्स अहमद खानच्या कॉमेडी चित्रपटात ‘वेलकम टू द जंगल’मध्ये काम करत आहेत. त्यातच सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये संजय दत्त असल्याचे कळल्याने चाहते खूश झाले होते. परंतु या चित्रपटातून संजय दत्तने माघार घेतली आहे. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, संजय दत्तने चित्रपट सोडण्याचे कारण म्हणून तारखेचा मुद्दा समोर आणला आहे. सूत्राने सांगितले की, “संजय दत्तला वाटले की वेलकम टू द जंगलचे शूटिंग नियमित पद्धतीने आयोजित केले गेली नाही.

विकी-कतरिनाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल? व्हिडिओ आला समोर!

स्क्रिप्टमध्ये बरेच बदल केले जात असल्यामुळे त्यामुळे त्यांना शूटिंग करत असताना त्रास होत होता म्हणूनच संजय दत्तने हा सिनेमा सोडल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे संजय दत्तने हा निर्णय घेतला आहे. त्यांनी या सिनेमाचं एकच दिवस शूटिंग केलं आणि या चित्रपटातून माघार घेतली. ‘वेलकम टू द जंगल’ हा लोकप्रिय ‘वेलकम’ सिनेमाचा तिसरा भाग असून या सिनेमात संजयच्या व्यक्तिरेखेची चित्रपटात खूप ॲक्शन होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या आरोग्याचा विचार करत चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने माघार घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img