18.8 C
New York

Loksabha Election : EVM मशीनला हार, शांतीगिरी महाराजांना प्रकरण भोवणार

Published:

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली. राज्यात १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघाशिवाय, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या सात मतदारसंघात (Maharashtra Lok Sabha Election) मतदान सुरू झालं. दरम्यान, नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) ईव्हीएम मशीनला हार घातला.

सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी पहिला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली तर शांतीगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. यापूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शांतीगिरी महाराजांच्या अडणतीत वाढ होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Loksabha Election हार का घातला ?

मतदान ही अत्यंत पवित्र प्रक्रिया आहे. या मशिनजवळ येऊन सर्व नागरिक मतदान करणार आहेत. त्या सर्वांना सद्भबुध्दी यावी, त्यांचं मत भारत मातेच्या कामात यावं. भविष्यात कुणालाही पश्चाताप करायची वेळ येऊ नये, म्हणून पवित्र हार आम्ही ईव्हीएम मशीनला घातल्याचं शांतीगिरी महाराजांनी सांगितलं.

हेही वाचा : मध्य रेल्वे मतदानाच्या दिवशी विस्कळीत

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितलं की, समाज आमच्यावर प्रेम करतो. भाजपसह समाजातील सर्व हिंदू संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, यंदा आमचा विजय होईल, असा दावा शांतीगिरी महाराजांनी केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केलं.

Loksabha Election नाशिकमध्ये तिरंगी लढत….

नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून राजाभाऊ वाझे हे रिंगणात आहेत. नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Loksabha Election ठाण्यातील नौपाड्याला मतदान यंत्रात बिघाड

ठाण्यात नौपाडा मतदारसंघात सकाळी तासभरापासून मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी मतदान केंद्रांवर दाखल होत मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img