23.1 C
New York

Pune : पुण्यातील ‘त्या’ अपघातावर फडणवीसांचे पोलिसांना ‘हे’ निर्देश

Published:

मुंबई

पुण्यातील (Pune) प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आणि ब्रह्मा क्रॉपचे संचालक विशाल अग्रवाल (Vedant Agarwal) यांचा मुलीच्या गाडीने 19 मे रोजी पुण्यातील (Accident) कल्याण नगर (Kalyani Nagar Accident) मध्ये दोन तरुण आणि तरुणीला चिरडले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) आरोपीला तत्काळ जामीन दिल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत होता. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हस्तक्षेप करत पुणे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहे.

पुणे शहरात झालेल्या अपघातामध्ये आरोपीला जामीन देण्यात आला असला तरी या प्रकरणात अपील करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 19 मे रोजी झालेल्या या अपघातामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया या दोन तरुण-तरुणींचा मृत्यू झाला होता. पुण्यातील बिल्डरच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून 2 जणांचे जीव घेतल्याच्या घटनेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन याबाबत सूचना केल्या.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केल्या. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा असे निर्देश फडणवीसांनी दिले.

नेमका अपघात कसा घडला?
वेदांत अगरवाल हा रविवारी पहाटे त्याच्या मित्रांसोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या,दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवत अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने वाहनचलाक वेदांतला पकडून चोप दिला.

वेदांत हा ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा आहे. दरम्यान, आपल्या भौतिक सुखातील धुंदीत वेदांतने भरधाव वेगाने कार चालवून काहीही चूक नसलेल्या दोघांचा बळी घेतला. त्यामुळे, अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img