26.2 C
New York

Loksabha Elections : देशात 1 पर्यंत 36.73 टक्के मतदान

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.73% मतदान झाले. आधीच्या चार टप्प्यांप्रमाणेच यावेळीही महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे. राज्यात दुपारपर्यंत अवघे 27.78% मतदान झाले. ओदिशा राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 35.31% मतदान झाले. झारखंडमधील गांडे मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत 40.38% मतदान झाले. उत्तर प्रदेशातील लखनऊ पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत 34.03% मतदान झाले.

महाराष्ट्रात सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. राज्यात सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सरासरी 27.78 टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यासाठी आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघाशिवाय, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या सहा लोकसभा मतदारसंघात (Maharashtra Loksabha Election) मतदान होत आहे.

देशात दुपारी १ वाजेपर्यंत लडाखमध्ये सर्वाधिक ५२ टक्के मतदान झाले. तर त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 48.41टक्के मतदान झाले. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने काश्मीर, लडाखच्या नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. तर बंगालमध्ये वाढलेला टक्का ममता बॅनर्जी यांच्यासाठी चिंतेचा विषय बनणार आहे.

महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नोंदवले (33.25%) गेले. तर सर्वाधिक कमी मतदान कल्याणमध्ये 22.52% झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील 48 पैकी 35 जागांसाठी 4 टप्प्यात निवडणूक पार पडली. लोकसभेच्या 13 जागांसाठी 264 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील 6, ठाण्याचा 3, पालघरचा 1, नाशिकचा 2 आणि धुळ्याचा 1 मतदारसंघांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अभिनेते-राजकारणी भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल कीर्तीकर, श्रीकांत शिंदे आणि हेमंत तुकाराम गोडसे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात सर्वांच्या नजरा या उमेदवारांवर असतील.

मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- 28.73 टक्के
दिंडोरी- 33.25 टक्के
नाशिक – 28.51 टक्के
पालघर- 31.06 टक्के
भिवंडी- 27.34 टक्के
कल्याण – 22.52 टक्के
ठाणे – 26 .05 टक्के
मुंबई उत्तर – 26.78 टक्के
वायव्य मुंबई – 28 .41 टक्के
ईशान्य मुंबई – 28.82 टक्के
मुंबई उत्तर – मध्य – 28 .05 टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- 27.21 टक्के
मुंबई दक्षिण – 24 .46 टक्के

बिहार 34.62%
जम्मू आणि काश्मीर 34.79%
झारखंड 41.89 %
लडाख 52.02%
महाराष्ट्र 27.78%
ओदिशा 35.31%
उत्तर प्रदेश 39.55%
पश्चिम बंगाल 48.41%

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img