23.1 C
New York

Loksabha : मतदानादरम्यान फडणवीसांची आयोगाकडे ‘ही’ विनंती

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकी (Loksabha) पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. राज्यात 13 लोकसभा मतदार संघावर मतदान पार पडत आहे. मात्र देशाच्या तुलनेत राज्यात संथ गतीने मतदान सुरू असलेल्या तक्रारी मिळत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट निवडणूक आयोगाकडे (Election Commission) मतदान प्रक्रिया संदर्भात मोठी विनंती केली आहे.

राज्यातील आज 13 लोकसभा मतदारसंघात आणि शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान सुरू आहे. मात्र आज सकाळपासून राज्यात होत असलेले मतदान हे संथ गतीने होत असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट निवडणूक आयोगाकडे मतदानाची गती वाढवण्यात करिता विनंती केली आहे.

महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया चालू आहे. या मतदारसंघातील 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळपासून राज्यातील 13 ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली, मात्र दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 27.78 टक्के इतके मतदान झाले. मतदानाच्या संथ गतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी यांनी गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाकडे मतदानाची गती वाढवण्यासाठी विनंती केलीय.

मुंबई तसेच परिसरात संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणांवरुन येत असल्याने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने त्यात तातडीने लक्ष घालून मतदानाचा वेग कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाकडे केली आहे.

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.

माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img