18.8 C
New York

Lok Sabha elections : राज्यात सकाळी 9 पर्यंत 6.33 टक्के मतदान

Published:

आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. सकाळी 7 ते 9 पर्यंत महाराष्ट्र सरासरी 6.33 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यासाठी आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघाशिवाय, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या सहा लोकसभा मतदारसंघात (Maharashtra Lok Sabha Election) मतदान होत आहे. सकाळी सात वाजत मतदान सुरू झालं.

Lok Sabha elections राज्यातील मतदानाची टक्केवारी

भिवंडी – 4.86
धुळे – 6.92
दिंडोरी – 6.40
कल्याण – 5.39
दक्षिण मुंबई – 6.19
उत्तर मध्य – 6.01
उत्तर पूर्व – 6.87
दक्षिण – 5.34
दक्षिण मध्य – 7.79
नाशिक – 6.45
पालघऱ – 7.95
ठाणे – 5.67

महाराष्ट्रात आज शेवटच्या टप्प्यात मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील 48 पैकी 35 जागांसाठी 4 टप्प्यात निवडणूक पार पडली. लोकसभेच्या 13 जागांसाठी 264 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील 6, ठाण्याचा 3, पालघरचा 1, नाशिकचा 2 आणि धुळ्याचा 1 मतदारसंघांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अभिनेते-राजकारणी भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल कीर्तीकर, श्रीकांत शिंदे आणि हेमंत तुकाराम गोडसे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात सर्वांच्या नजरा या उमेदवारांवर असतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img