19.7 C
New York

Pune Accident  : पुण्यात भरधाव कारने दोघांना चिरडलं

Published:

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. Pune Accident मद्यधुंद अवस्थेत सुपरकार चालकाने एका बाईकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, बाईकवरील तरुण आणि तरुणी हे हवेत उडून दूरवर पडले. या अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. कार चालक आरोपी हा १७ वर्षीय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील एका हॉटेलमधून अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे जण शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पार्टी करून दुचाकीवरून घरी निघाले होते.

Pune Accident  पोलीस पुढील तपास करत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) हिला पाठीमागून जोरात धडक दिली.या अपघातात अनिस अवधिया व मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत. ”त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सतरा वर्षीय मुलगा पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अजून अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे.

1 जूनपासून बदलणार बैलगाडा शर्यतीचा ‘हा’ नियम

अपघातस्थळावरुन कार चालक हा पळ काढण्याच्या तयारीत होता मात्र, नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला.मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक हा 17 वर्षीय आहे आणि मद्यधुंद अवस्थेत तो गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर हा तरुण प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Pune Accident  दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

मृत्यू झालेला अनिस दोन दिवसांपूर्वीच बाहेरदेशातूनपुण्यात परतला होता. पार्टीसाठी मैत्रीसोबत गेला आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव चालक हा फक्त सतरा वर्षांचा आहे. त्यात परवाना नसताना तो पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवत होता. याच गाडीच्या धडकेत दोघांचा नाहक जीव गेला. पोर्शेसारखी महागड्या गाडीचं यात मोठं नुकसान झालं आहे. त्यात अशा श्रीमंतांच्या मुलांच्या या अशा भरधाव गाडीच्या वेगाने अजून किती जणांचा जीव घेणार आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img