22.3 C
New York

Water Crisis : मराठवाड्याला दुष्काळाचं संकट

Published:

मराठवाड्यातील नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा Water Crisis सामना करावा लागतोय. मपाण्याचा स्त्रोतच मराठवाड्यात अनेक गावात उरला नसल्याची परिस्तिथी आहे. अनेक गावात विहिरी, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहे. अशात प्रशासनाकडून पुरवले जाणाऱ्या टँकरच्या पाण्यावर तहान भागवली जात आहे. मराठवाड्याची तहान भागवणारा आणि आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात देखील फक्त 6.35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे.

गेल्या वर्षी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावागावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गावात त्यातही हे टँकर आठ दिवसातून एकदा येतो. त्यामुळे आठ दिवसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू असते. जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक टँकर सुरू आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला असं म्हणण्याची वेळ धरण परिसरातील गावकऱ्यांवर आली आहे. पुढील आठवड्यात ही परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे.

कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साईड इफ्केट्स आले समोर

Water Crisis जायकवाडी धरण पाणीसाठा -16 मे 2024

जायकवाडी धरण पाणी पातळी – 1497.30 फूट

जायकवाडी धरण पाणी पातळी – 456.377 मीटर

एकूण पाणीसाठा दलघमी – 875.92 दलघमी

Water Crisis आठ दिवसांनी एकदा आंघोळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. पैठण तालुक्यातील अनेक गावात आठ दिवसांनी टँकर येतो. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याची बचत करावी लागते. अब्दुलपूर तांडा येथील गावकरी तर चक्क आठ दिवसांनी एकदा आंघोळ करतात. पिण्यासाठी विकत पाणी घ्यावं लागतं.

Water Crisis राज्यातही पाणी टंचाई

राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावागावात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील 9 हजार 596 गावं आणि वाड्यांवर, तब्बल 3 हजार 417 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू आहे. अनेक गावात तर आठ दिवसांनी एकदा टँकर येत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राची टँकरवाड्याच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img