21 C
New York

Mumbai Attack : उज्ज्वल निकम यांनी सत्य सांगावे- आंबेडकर

Published:

मुंबई

उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना विनंती करतो की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर (Mumbai Attack) दबाव असेल. आता आपण लोकसभेचे (Loksabha Election) उमेदवार आहात आता कोणताही दबाव नाही. प्रामाणिकपणे निकम यांनी सांगावं की, त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का ? की, करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे लीड करू नका अशा कोणी सूचना दिल्या होत्या का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला.

आंबेडकर म्हणाले की, जसे परकियांकडून देशाच्या एकतेला धोका आहे, तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हटले आहे की, या देशात जयचंद किती निर्माण झाले आणि या भारताला स्वतंत्र अस्तित्व गमवावं लागलं त्याची उदाहरणे त्यांनी दिले आहेत. मी उज्ज्वल निकम यांना आवाहन करतोय की, 26/11 मध्ये काय घडलं आहे ? हे लोकांना प्रामाणिकपणे सांगावे. आपण सांगितलेली व्यक्ती आणि संघटना या देशात जयचंदचे काम करणार का याबद्दल जनता निर्णय घेईल.

26/11 हल्ला झाला. त्या हल्ल्यामागील एक हल्ला आहे. ज्याने कोणी हल्ला केला त्याला माहिती होतं की, पाकिस्तान हल्ला करणार आहे. याचा अर्थ त्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. तो संबंध भाजप का उलगडत नाही? असा प्रश्न आंबेडकर यांनी भाजपला विचारला. तसेच, जनतेने उज्ज्वल निकम यांना विचारले पाहिजे की, तुम्ही राष्ट्राशी प्रामाणिक नाही तर आम्ही तुम्हाला का मतदान करावं? असाही सवाल त्यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img