19.7 C
New York

Kolhapur : हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू

Published:

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिघांचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. एक म्हणजे तिघेही एकाच कुटुंबातील होते. कुटुंबातील सदस्य कपडे धुण्यासाठी नदीकाठी आले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील (Ajra Taluka) हिरण्यकेशी नदीत धुणं धुण्यासाठी कटाळे कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले होते. यावेळी तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीकाठी धाव घेतली. नजीकच्या बंधाऱ्यात काहींनी गजरगाव तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

Kolhapur मृतांची नावे पुढीलप्रमाणे

उदय बचाराम कटाळे, अरुण बचाराम कटाळे, प्रकाश अरुण कटाळे

सांगवी सुनेगावात शून्य टक्के मतदान, काय आहे हा प्रकार ?

Kolhapur पाझर तलावात बुडून तिघांचा मृत्यू

दरम्यान, करेकुंडी येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेलेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. भर उन्हात करेकुंडी येथील पाझर तलावात शाळकरी मुली पोहायला गेल्या होत्या. दमछाक झाल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. यावेळी सेवानिवृत्त विजय विठोबा शिनोळकर हे त्यांना वाचवायला गेले. सायंकाळी तलावाच्या काठावर तिघांचे कपडे गावातील एकाला दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिन्ही मृतदेह ग्रामस्थांनी पाण्याबरोबर काढले.

केजरीवाल संदर्भात कोर्टाचे मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img