23.1 C
New York

Navi Mumbai : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

Published:

नवी मुंबई

पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंध असावेत अशा गैरसमजा पोटी पत्नीच्या डोक्यात जड वस्तूचा घाव घालून तिला ठार केल्या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात (Navi Mumbai) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार घडल्यावर पती फरार झाला होता मात्र त्याला शोधून रविवारी रात्री अटक करण्यात आले आहे.

साठ वर्षीय उस्मान सरदार असे यातील आरोपीचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह दारावे गावातील मारी माता भवन इमारतीत राहतो. त्याच्या पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंध आहेत असा त्याचा समज होता. यातूनच पती पत्नीचे अनेकदा वाद होत होते. त्यातूनच शनिवारी दुपारी त्यांचे वाद झाले. दुर्दैवाने त्यावेळी घरात कोणी नव्हते. या वादात रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात जड वस्तू घातली. त्या घावामुळे प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. हे लक्षात येताच त्याने पलायन केले. काही वेळाने जेव्हा त्याचा मुलगा घरी आला त्यावेळी आई निपचित पडलेली त्याने पहिली तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेविषयी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून फरशीवर रक्ताचे डाग असलेला कापसाचा बोळा, रक्ताने माखलेली ओढणी, रक्ताने माखलेले दोन चाकू, एक रक्त लागलेला शर्ट जप्त केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img