23.1 C
New York

Chhagan Bhujbal : यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल, भुजबळांचं महत्वाचं विधान

Published:

महाराष्ट्रात एनडीएला (The NDA in Maharashtra) 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक जितकी सोपी गेली तितकी सोपी नसेल. त्यावेळी लोकसभेच्या त्यांनी 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाजूने सहानुभूतीची लाट असल्याचे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. यामुळे 400 पारचा नाऱ्याने सुद्धा अडचण झाल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेण्याच्या त्यांच्या निर्णयावरही खुलासा केला. एनडीएचा 400 जागा जिंकण्याचा नाऱ्यावरही त्यांनी भाष्य केले. ‘अब की बार 400 पार’ घोषणेमुळे घटनेमध्ये बदल केला जाणार असल्याचा मत मतदारांमध्ये झाल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. 40 आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपला साथ दिली आणि राज्यात सत्ताबदल झाला.त्यानंतर 2023 मध्ये अजित पवारांनीदेखील असाश प्रकारे बंड केलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. 2 प्रादेशिक पक्ष मागील २ वर्षांत राज्यानं फुटताना पाहिले. त्या पार्श्वभूमीवर होणारी लोकसभा निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाची आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करण्यात आघाडीवर असलेल्या भुजबळांना लोकसभा निवडणुकीत याचा काय परिणाम होईल? या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिले ते म्हणाले, या बद्दल मला विश्वास आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी जनतेच्या मनात सहानुभूतीची लाट आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या बद्दलही जनतेच्या मनात सहानुभूती आहे, त्यामुळे मागील दोन निवडणुकीत ज्यापद्धतीने त्यांनी कामगिरी केली त्यापद्धतीने कामगिरी करण्यात मागे पडतील, असे वाटत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपनं दिलेल्या अब की बार ४०० बार घोषणेवरही त्यांनी भाष्य केलं. ‘संविधान बदलण्यासाठी 400 पेक्षा अधिक जागा एनडीएला हव्या आहेत, असा प्रचार केला जात आहे. लोकांच्या मनात काही प्रमाणात शंका आहे. असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं

शरद पवार यांच्या बारामतीच्या बालेकिल्ल्यावर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्यातील लढतीबद्दल विचारले असता महाराष्ट्राचे मंत्री थोडेसे भावूक झाले. “माझ्यासाठीही हे दुःखदायक आहे की, जे लोक एकाच घरात इतकी वर्षे एकत्र राहत आहेत. जे काही घडत आहे ते अनेकांना आवडत नाही. यात दोष कोणाचा, हा वेगळा मुद्दा आहे. पण हे घडले नसते तर खूप चांगले झाले असते,” असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img