23.1 C
New York

Lok Sabha elections : राज्यात मतदानाची टक्केवारी घसरली

Published:

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. त्यामध्ये मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील पाच मतदारसंघाचा यात समावेश आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती.राज्यातील या आठही मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.51 टक्के मतदान झाले. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. शांततेत मतदान व्हावे यासाठी देशभरात यंत्रणा सज्ज झाली आहे. अनेक मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, दिवसभरात फारच कमी मतदान झाले आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात किती मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या पाच जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या जागांवर एकूण 63.70 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले?

पहिल्या टप्प्यात

  • रामटेक – 58.50 टक्के,
  • नागपूर 53.71 टक्के,
  • भंडारा-गोंदिया 64.08 टक्के,
  • गडचिरोली- चिमूर 67.17 टक्के,
  • चंद्रपूर 60.03 टक्के

दुसऱ्या टप्प्यात

  • वर्धा- 56.66 टक्के
  • अकोला- 52.49 टक्के
  • अमरावती- 54.50 टक्के
  • बुलढाणा- 52.24 टक्के
  • हिंगोली- 52.03 टक्के
  • नांदेड- 52.47 टक्के
  • परभणी- 53.79 टक्के
  • यवतमाळ-वाशिम- 54.04 टक्के

यवतमाळ-वाशीममधून राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्यात थेट लढत आहे. तर अमरावतीत नवनीत राणा आणि दिनेश बूब यांच्यात चुरस आहे. पण, मतदार राजाने मतदानाकडे पाठ फिरवल्याने निवडून येणारे उमेदवार फारच कमी फरकाने निवडून येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये धाकधुक वाढली आहे. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारनंतर मतदान मतदान केंद्रावर फिरकतील अशी शक्यता होती. दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी केवळ 43 टक्के मतदान झाले होते. मात्र, पाच वाजेपर्यंतही केवळ पन्नास टक्केच मतदान झाले.

गेल्या निवडणुकीत कसा होता मतदानाचा टक्का ?

गेल्या निवडणुकीत यवतमाळ-वाशीममध्ये सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. नांदेडमध्ये 60.88 टक्के मतदान झाले होते. तर अकोल्यात 54.45 टक्के, परभणमध्ये 62.54 टक्के, बुलडाणा 57 टक्के, अमरावती 55 टक्के, हिंगोलीत 61 टक्के, नांदेडमध्ये 61 टक्के मतदान झाले होतो.

नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन फोडली?

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर घटना घडली. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात घुसून व्हीव्हीपीएटी मशीन व बॅलेट मशीन कुऱ्हाडीने फोडली. त्या व्यक्तीने मतदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img