23.1 C
New York

Konkan Railway : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी…

Published:

कोकणातील अनेक लोक मुंबईत स्थायिक झाले आहेत. कोकणातील लोक उन्हाळी सुट्ट्यांपासून गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत गावी जात असतात. या काळात कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे कोकणातील लोकांना सहज आरक्षण मिळत नाहीत. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावार दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. याच कारणामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाडया रद्द करण्यात येतात. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर येत्या 10 जूननंतर कोकणात जाणारी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. यामुळे कोकणात जाणारी चाकरमानी लोक संभ्रात पडले होते. परंतु आता गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहेत.

कोकण रेल्वे पावसाळ्यात दरडीचा धोका लक्षात घेऊन 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक लागू करते. तसेच प्रवासाच्या 120 दिवस आधी रेल्वेचे आरक्षण सुरू होते असते. कोकणाकडे जाणाऱ्या तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे आरक्षण अखेर खुले झाले नव्हते. आता हे आरक्षण शुक्रवारपासून सुरु झाले आहे. आता काळजी करण्याचे कारण नसून पावसाळ्यात तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस सुरु राहणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे की पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेत स्थळावर १० जून नंतरच्या या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारपासून हे आरक्षण सुरु झाले आहे.

कोकण आणि मध्य रेल्वेने कोकण मार्गावर उन्हाळी सुट्यांमध्ये 36 विशेष वातानुकूलित रेल्वे सुरु केल्या आहेत. ही रेल्वे 26 एप्रिल ते 2 जूनपर्यंत धावणार आहे. यामुळे कोकणवासीयांना वातानुकूलित रेल्वेतून प्रवाशाचा आनंद मिळणार आहे. या विशेष रेल्वेमध्ये 15 तृतीय वातानुकूलित कोच आहे. तसेच मुंबई आणि दानापूर दरम्यान दोन विशेष रेल्वे चालवली जाणार आहे. ट्रेन संख्या 01017 एसी स्पेशल ट्रेन 26 एप्रिल ते 2 जूनपर्यंत प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार असणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन रात्री 10.15 वाजता ही गाडी सुटणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img