23.1 C
New York

Arbazz Khan: सलमान खान गोळीबार प्रकरणात अरबाज खानचं मोठं वक्तव्य! घर बदलण्याचा विचार…

Published:

(Arbazz Khan) रविवार (१४ एप्रिल) रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील घरावर गोळीबार केला होता. या प्रकरणानंतर संपूर्ण सिनेसृष्टी हदरून गेली. मुंबई गुन्हे शाखेला आरोपींना पकडण्यात मोठे यश आले. मुंबई पोलिसांनी गुजरातमधील भुज येथून दोन आरोपींना पकडले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात मधील वापी नदीतून दोन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि ४० जिवंत कडतूस जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री आणखी दोन आरोपींना पंजाब येथून अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.


मात्र आता, सलमानचा भाऊ अरबाज खान याने मोठे वक्तव्य केले आहे. गोळीबार प्रकरणामुळे कुटुंबाची सुरक्षिता पाहता. गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडतील का? असं विचारल्यावर अरबाजने उत्तर दिलं आहे. या प्रकरणानंतर खान कुटुंब गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून दुसरीकडे राहायला जाणार का? असं विचारल्यावर तो म्हणाला “असं केल्याने सगळं ठीक होईल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला असं वाटत का की नवीन ठिकाणी गेल्यावर धोका कमी होईल? असं. असत तर नक्की घर बदलण्याचा विचार केला असता. पण घर बदलल्याने हा धोका टळणार नाही हे सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगून आयुष्यात पुढे जावं लागेल.”


पुढे तो म्हणाला, “अशा वेळेला एखादी व्यक्ती फक्त जवाबदारी घेऊन शकते. त्याशिवाय खासगी किंवा सरकारने पुरवलेली सुरक्षा व्यवस्था वापरू शकते. जितकं सामान्य जगता येईल तितकं सामान्य जगायचा प्रयत्न करू शकते.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img