19.7 C
New York

Loksabha Elections : महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत 31 टक्के मतदान

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकी (Loksabha Elections) मधील देशामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशातील 13 राज्यामध्ये 88 जागेवर आज मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 31.77 टक्के सरासरी मतदान झाल्याची नोंद नोंदवण्यात आली आहे. सर्वाधिक मतदान परभणी (Parbhani) मध्ये 33.88 टक्के तर बुलढाणा (Buldhana) मध्ये सर्वाधिक कमी मतदान 29.60 टक्के झाले आहे.

लोकसभा निवडणुकी मधील पहिल्या टप्प्यामध्ये देखील राज्यात कमी प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात अधिक मतदान व्हावे याकरिता अनेक प्रयत्न करण्यात आले होते. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या मतदान महाराष्ट्र 31.77% सरासरी नोंदवण्यात आले आहे. मात्र हा टक्कर सायंकाळी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा जागांसाठी आज मतदान पार पडत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये 37 उमेदवार आपलं भाग्य आजमावत आहे. त्याखालोखाल परभणीत 34, हिंगोलीत 33, वर्धामध्ये 24, नांदेडमध्ये 23, बुलढाणामध्ये 21, यवतमाळ-वाशीम मतदारसंघात 17 आणि अकोलामध्ये 15 अशी मतदारांची संख्या आहे.

आठ मतदार संघात अशी आहे लढत

हिंगोली
हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे.

परभणी
महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या विरोधात परभणी लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.

नांदेड
नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर हे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या विरोधात आहेत.

बुलढाणा
शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत.

यवतमाळ-वाशीम
शिवसेने शिंदे गटाच्या वतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

अकोला
अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत आहे.

अमरावती
अमरावतीत भाजपाचे उमेदवार खासदार नवनीत राणा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखडे तर दिनेश बुब हे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवारही रिंगणात आहेत.

वर्धा
वर्ध्यात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणारे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे


वर्धा – ३२.३२ टक्के
अकोला -३२.२५ टक्के
अमरावती – ३१.४०टक्के
बुलढाणा – २९.०७ टक्के
हिंगोली – ३०.४६ टक्के
नांदेड – ३२.९३ टक्के
परभणी -३३.८८ टक्के
यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img