23.1 C
New York

Loksabha Elections : जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) वातावरणात बदल होत आहे. देशातील जनतेने निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. विद्यार्थी हा दिशा बदलत आहे. हे येणाऱ्या काळात दिसून येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की देशांमध्ये हुकूमशाही सरकार विरोधात देशातील वातावरण बदलले आहे देशातील जनतेने आता ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्ता बदल होणार आहे ज्यावेळी विद्यार्थ्यांनी परिवर्तन घडवून आणण्याचे ठरवले तर परिवर्तन होतच हे अनेकदा निदर्शनास आले आहे सध्या ही निवडणूक देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी हातात घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या चार मे रोजी देशात सत्ता परिवर्तन होणार आता हे जवळपास निश्चित झाले आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या संदर्भात कुठलेही वक्तव्य करण्यात येत नाही आहे काँग्रेसने प्रियंका गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधानांकडून नरेतिवे सेट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दहा वर्षात कुठल्याही प्रकारचा विकास करता आला नसल्याने सध्या कुठलेही मुद्दे प्रचारासाठी नसल्यामुळेच असा प्रयत्न करण्यात येत आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलणाऱ्या विरोधात एकजुटीने उभ राहण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाने राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. या संदर्भातील पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img