26.6 C
New York

Mango Rates : अवकाळीमुळे फळांच्या राजावर मोठा परिणाम

Published:

सध्या आंबा (Mango Rates) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) चांगले दिवस आले आहेत. अवकाळीमुळे आंब्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरच्या (Nagpur) कळमना फळमार्केटमध्ये आंब्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी दक्षिणेतून आलेल्या आंब्याचा दर 40 रुपये किलो होता. यंदा आंब्याची आवक कमी झाल्याने आंब्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर गेला आहे.

अवकाळी पावसामुळं आंब्याचं मोठं नुकसान

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून नागपूरात आंब्याची आवक होते. त्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा चांगलातडाखा बसला होता. या जिल्ह्यांमध्ये लिंबू, आंबा, तसेच भाजीपाला, केळी पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. यावर्षी आधीच बदलत्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं आंब्याचं उत्पादन कमी आहे. अशातच पुन्हा अवकाळी पावसानं तडाखा दिल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आंबा उत्पादनात अग्रेसर असणारी राज्ये कोणती?

आता सध्याच्या परिस्थितीत देशातील अनेक राज्यात आंब्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यांचा समावेश आहे. देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 65 टक्के उत्पादन या पाच राज्यात होते. म्हणजे फक्त 35 टक्के आंब्याचे उत्पादन हे इतर राज्यात घेतलं जातं. आंब्याचं उत्पादन महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कोकण विभाग आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. दरम्यान, पहिल्या पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर लागत नाही. आंबा हा आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्ते असतात. त्यामुळं आंब्याच्या हंगामात आहारात मोठ्या प्रमाणात आंब्याचा वापर केला जातो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img